HW News Marathi
Covid-19

काय नुसता गोंधळ लावलाय ?सरकारच्या नविन नियमामुळे चित्रा वाघ संतापल्या !

मुंबई | महाराष्ट्रातील वाढती कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकराने राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.प्रवासावर मर्यादा लावण्यात आल्या आहेत.२२ एप्रिलपासुन महाराष्ट्रात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जर महाराष्ट्रातील कोणाला आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवास करायचा असेल त्याला आता ई-पास असणे आवश्यक आहे. कोणी बाहेरून जिल्ह्यात आल्यास त्यांच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचं महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आलंय. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा नियमांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. सतत बदलणाऱ्या नियमांमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यावरुन, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारचा नुसता गोंधळ सुरू असल्याचं म्हटलंय.त्यांनी ट्विट केलं आहे की,हे काय आता नविन… काल परवापर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं. आता, अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा, ज्याने लोकांना मदत होईल. राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ई-पास प्रणालीवरुन नाराजी दर्शवली आहे.

 

महाराष्ट्र पोलीसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ई-पास संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची सुविधा सुरू करण्यात येत आहे. आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://covid19.mhpolice.in अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता. पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.”, असे या ट्विटमध्ये म्हटलंय. चित्रा वाघ यांनी हे ट्विटही शेअर केलं असून सगळा गोंधळ सुरू असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेकडून ३० जूनपर्यंत सर्व बुकिंग रद्द, विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार

News Desk

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या ! जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे पुन्हा मागणी

News Desk

पक्ष वाढवा कोरोना नाही, मुख्यमंत्र्यांची सर्व राजकीय पक्षांना तंबी

News Desk