HW News Marathi
महाराष्ट्र

एकबोटेंना वेळीच का अटक केले नाही, विश्वास नांगरे पाटीलांचे उत्तर

पुणे | भिमा-कोरेगाव प्रकरणात मिलिंद एकबोटेंना वेळीच का अटक केले नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला होता.. ‘मिलिंद एकबोटेंना आधीच दिलासा मिळाला होता. त्याअनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करुन जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार १४ मार्चला ताकदीनिशी न्यायालयात आमची बाजू मांडू.’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

‘मिलिंद एकबोटे हे सातत्याने गायब होत असल्यामुळे ते आम्हाला सापडतेच नव्हते.’ असे हास्यास्पद उत्तर महाराष्ट्र सरकारने दिले आहे. सरकारच्या या दाव्याचा खुद एकबोटे यांच्या वकीलाकडून नकार करण्यात आला‘आम्ही पोलिसांना सहकार्य करायला तयार आहोत, पण तेच बोलवत नाहीत’ असे एकबोटे यांचे वकीलांनी यावर उत्तर दिले आहे. पुढली सुनावणी १४ मार्च होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची जय्यत तयारी

News Desk

पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही, चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती

News Desk

अर्थसंकल्पावर समानधानकारक उत्तरे नाहीत, फडणवीसांचा सभात्याग

swarit