HW News Marathi
महाराष्ट्र

“किल्ला पडलेला का आहे? पूर्वी किल्ला कसा दिसायचा?”

नागपूर | गेली ४ वर्षे दिवाळीत मातीचे किल्ले बनवणारे नागपूरचे अजिंक्य जोशी आणि पुष्कर व प्रसाद दहासहस्त्र यांना लहान शाळकरी मुले विचारत असत. त्यामुळे, यंदाच्या वर्षी जेव्हा छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड बनवण्याचा निर्धार या त्रिकुटाने केला, तेव्हाच शिवकाळात रायगड कसा दिसत असावा याची काल्पनिक प्रतिकृती उभी करण्याचे ठरवले. त्यासाठी, प्रत्यक्ष किल्ले रायगडच्या २ वेळा वाऱ्या केल्या; थेट नागपूर ते रायगड आणि तिथल्या सध्याच्या वास्तू आणि जोते यांच्या वरून शिवकालीन गडाचे काल्पनिक चित्र उभारले.

आपण मातीचे किल्ले लहान मुलांवर संस्कृती आणि परंपरा यांचे संस्कार व्हावे यासाठी बनवतो, त्यामुळे त्यांना पडलेला किल्ला न दाखवता, शिवकालीन अंदाजित किल्ला दाखवावा, असा निर्धार केला. त्यासाठी, पुण्याचे प्राध्यापक सचिन जोशी यांचे मार्गदर्शन घेतले व अनेक रायगडचे पुरातत्वीय नकाशे जमवले. शिवाय, गोपाळ चांदोरकर यांच्या श्रीमद रायगिरौ यांच्या पुस्तकाचा आधार घेतला. त्याप्रमाणे, मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य जसे माती, विटा आणि लगदा जमवला. २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर किल्ला तयार केला. किल्ल्याला महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकटा संभाजी काय करेल, वडील शाहू महाराज पुत्राच्या मागे ठाम उभे!

News Desk

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडी मालकाचा सापडला मृतदेह

News Desk

दोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता…

News Desk