HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल !

नवी दिल्ली। “महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, आणि गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल,” असा विश्वास काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्यक्त केला आहे. अखेर राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकालल्यापासून राज्यात अस्थिर निर्माण झाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी काँग्रेस नेते अहमद पटेल उपस्थितीत महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास ३ तासांहून जास्त ही बैठक सुरू होती. या बैठकीत दोन्ही पक्षांनी सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर, राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“महाराष्ट्रामध्ये गेल्या २१ दिवसांपासून जी अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. चव्हाण पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, आणि गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आ. छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून के.सी वेणुगोपाळ, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान हे नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवास्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड, भाजपचा आरोप!

News Desk

गडकिल्ले लग्न, सभारंभांसाठी भाड्यावर देणार नाही, पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

News Desk

येत्या आठवड्यापासून पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार!

News Desk