HW News Marathi
Covid-19

राममंदिर भूमिपूजनादिवशी राज्यातील मंदिरे उघडणार ?

मुंबई| राज्यासोबत देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर राज्यभरातील मंदीर बंद करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला होता. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंदीरे देखील खुली करण्यात यावी याबाबत मात्र ठाम निर्णय राज्यात होत नव्हता.

या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदीर सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली असून त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा व उत्तर भारतीय संघाने मंदीरे खुली करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भाजप शिष्टमंडळाने ही मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे समजते आहे.

राममंदीर भूमीपूजनासाठी किमान एक दिवस मंदिरे खुली करण्याची मागणी करण्यात येणार असून भूमीपूजनादिवशी शंखनाद, थाळीनाद करण्याचा विचार बोलून दाखवला जात आहे. याबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार, मंदिरे फक्त एक दिवसच सुरू राहणार की या दिवसापासून ती खुली केली जाणार याबाबत अद्याप राज्यसरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री म्हणतात…

News Desk

“आता पाणी डोक्यावरून गेलं, आजच ऑक्सिजन पुरवा”, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं!

News Desk

घरपोच मद्यसेवा निर्णयाची अंमलबजावणी १५ मेपासून होणार

News Desk