HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरात पूर, मुंबई चिंब

मुंबईः दमदार पावसाने कोल्हापुर जिल्ह्याला झोडपून काढले. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. 41 फुटांवर पंचगंगेची पातळी पोहोचली आहे. आणखी 5 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापूराची स्थिती येऊ शकते. यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुलुंड, भांडूप, पवई,घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव परिसरात संततधार आहे. मुंबईबरोबरच ठाण्यातही रिपरिप सुरुच आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान,आज मुंबईत समुद्रात सकाळी सव्वा अकरा वाजता उधाणाच्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राच्या लाटा 4.62 मीटर्स उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं समुद्र किनारी फिरताना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तर तिकडे पालघर जिल्ह्यातही सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. रात्रीपासून सततच्या पावसामुळं सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. मान्सून सुरु झाल्यापासूनच वरुणराजाची पालघर जिल्ह्यावर मेहेरबानी कायम आहे. कोकणातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील खारेपाटण बाजारपेठेत पाणी असल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना या पाण्यातून बाजारपेठेचे दैनंदिन व्यवहार करावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे! – विजय वडेट्टीवार

Aprna

पीक विम्याची रक्कम थकीत कर्ज म्हणून वसूल करण्याचे आदेश

News Desk

काँग्रेसला १२ मंत्रिपदे, त्यापैकी १० कॅबिनेट, बाळासाहेब थोरातांची माहिती

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

News Desk

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

News Desk

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारसाठी काँग्रेस नेते दिल्ली दाखल, पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा

News Desk