HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर तालुक्यातील शेतकऱ्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्त्या   

भोकर तालुक्यातील मौजे जांभळी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज परतफेडीच्या नैराश्येतून धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्त्या केली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी भोकर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मौ. जांभळी ता. भोकर येथील रहिवासी असलेला शेतकरी सुरेश उत्तम चव्हाण (वय ३५) हा गावाशेजारीच असलेल्या गट क्र.१९४ मध्ये असलेल्या त्याच्या सुवत:च्या शेतात नेहमी रात्रीला आखाड्यावर जागलीला जात असे. दि.२ मार्च २०१७ रोजी तो नेहमी प्रमाणे रात्रीला शेतात गेला होता. ३ मुलीच असलेल्या या शेतकऱ्यास अल्प शेती आहे व त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु सततची नापिकी व ३ मुलीच असल्यामुळे तो सदैव चिंतेत असायचा. मुलींचे लग्न करता यावे व त्यासाठी शेती उत्पन्न वाढवावे या हेतूने त्याने काही खासगी व काही सोसायटीचे कर्ज घेऊन नुकतेच शेतात एक बोअरवेल खोदले. त्यासही जेमतेमच पाणी लागले. येवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शेती करणे शक्य नसल्यामुळे तो घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेने अधिकच ग्रासला गेला. अशातच २ एप्रिलच्या रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान या शेतक-याचे वडील उत्तम चंदर चव्हाण हे त्याचे जेवण घेऊन शेतातील जागलीवर गेले असता सुरेश चव्हाण हा तेथे दिसला नाही. शेत शेजारी रमेश अमरसिंग राठोड यास उत्तम चव्हाण यांनी बोलाऊन घेतले व दोघांनी काही गावक-यांना बोलाऊन घेतले आणि सुरेश चव्हाण याचा शोध घेतला असता या तरुण शेतकरी सुरेश चव्हाण चा मृतदेह शेताशेजारील रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. रात्री 11 च्या सुमारास भोकरमार्गे अदिलाबाद – तिरुपती कृष्णा एक्सप्रेस मुदखेडकडे गेली होती. यावरुन प्राथमिक अंदाज वर्तविला जातो की या शेतकऱ्याने नैराष्यातून धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्त्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, राणेंचं डेरिंगबाज उत्तर

News Desk

राज्यात काल दिवसभरात ४, २८५ जण कोरोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू!

News Desk

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता शरद पवारांच्या दरबारी जाणार

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

News Desk

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

News Desk

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारसाठी काँग्रेस नेते दिल्ली दाखल, पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा

News Desk