HW News Marathi
महाराष्ट्र

साप चावल्यानं मुलीचा झोपेतच मृत्यू

सिल्लोड – आईसोबत झोपलेल्या मुलीला साप चावल्यानं मुलीचा झोपेतच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. मुलीच्या आईलाही साप चावला असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

सिल्लोड तालुक्यातील हट्टीफाटा नजीकच्या भगवान वाडीवर शनिवारी (दि. २२) ही घटना घडली. भगवान वाडीवरील सुरेश वाघ यांचे कुटुंबीय शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपलेले असताना सखुबाई सुरेश वाघ दुर्गा सुरेश वाघ (१५) या मायलेकींना सापाने चावा घेतला. या घटनेत मुलगी दुर्गा हिचा जागीच मृत्यू झाला. सखुबाई यांनी उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावरील संकट टळले. दुर्गा ही उंडणगाव येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेत शिकत हाेती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर–सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

कोरोना काळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी

News Desk

संग्रामपूर शहर विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करा! – बच्चू कडू

Aprna
महाराष्ट्र

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई. वक्फ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले असून या सर्वेक्षण ला मुसलमान बांधवांनी सहकार्य करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्ठमंडळाशी बोलताना त्यांनी सांगितले.

समाजाला समजून समाजाच्या समस्या, मूळ प्रश्नाला समजून आपण काम करत आहात त्याबद्दल मुसलमान समाजाच्या वतीने अन्सारी यांनी तागडे यांचे धन्यवाद दिले. ‘तहरी के औकाफ’ आज संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती दिली. तसेच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ९२ हजार एकर जमीन असून १ लाख मालमत्ता हि वक्फ बोर्डाची असून त्यासाठी ४३ कर्मचारी त्यात ९ शिपाई, १ वाहन चालक आहे. तर एवढ्या मोठ्या कारभाराला हे कर्मचारी सांभाळू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला होता. गोंदिया जिल्ह्यातून लोकं येतात नोंदणी चे २५०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ते आजपर्यंत मार्गी लागत नाही. हेरिंग साठी कोण भेटत नाही, लोकं थकून गेली, हैराण झालेत, परेशान झालीत. यांची कैफियत मांडली होती. कर्मचाऱ्यांच्या अभाव असल्याने त्यासाठी ग्रँड दिली गेली पाहिजे, किमान ६ कार्यालय झाली पाहिजेत, तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद असे ३ कार्यालय देतो, तसेच ७७० कर्मचारी देखील देण्याचे कबुली दिली होती. तर १०० कोटींची ग्रँड मागणी केली असता २०० कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा तागडे यांच्या कडे अन्सारी यांनी केली. वक्फ बोर्डात जर पहिल्या पासून चांगले काम झाले असते तर आज आम्ही खूप चांगले काम केले असते असे तागडे यांनी सांगितले. वक्फ बोर्ड हे वेल्टीलेटर आहे त्यात नक्कीच सुधार होईल असे आश्वासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिले. मालमत्तेचे जे दुसरे सर्वेक्षण सुरु आहे. त्याबद्दल तागडे यांनी आव्हान केले आहे की, समाजाच्या विविध संघटनांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर गावे-गावे फिरून लोकांशी चर्चा करून वक्फ मालमत्तेची माहिती घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत ती पोहचावा जेणे करून परिपूर्ण सर्वेक्षण होण्यास मदत होईल तसेच त्यासंदर्भात मी स्वतः दौरा करणार असल्याचे तागडे यांनी सांगितले. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आमच्या कडून वक्फ संदर्भात जनजागृती मोहीम केली जात असल्याची माहिती दिली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर चे अध्यक्ष इसाक खडके, मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, सइद खान, पुणे सदस्य सिराज शेख, सयेद शकील, परभणी चे अध्यक्ष सयेद फारूक, मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.

Related posts

वनविकास महामंडळाने मोठी झेप घ्यावी! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज !

News Desk

ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात १८ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर

swarit