HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरमध्ये शेतक-यांचा संप सुरूच

अभिराज उबाळे

पंढरपूर :- राज्यातील शेतक-यांना पुकारलेला संप मिटला असे जाहिर झाले असले तरी सोलापुर जिल्ह्यात मात्र आज ही आंदोलने सुरु आहेत . मोहोळचा आठवडे बाजार आज जनहित शेतकरी संघटनेने बंद केलाय . मोहोळ मध्ये जनावरांचा बाजार देखिल मोठ्या प्रमाणार भरतो तो ही बंद करण्यात आलाय . काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकित फक्त आश्वासनाचे गाजर दाखवण्यात आलय . शेतकर्यांची कोणतीहि मागणी मान्य न होता संप मागे घेणारे सरकारचे दलाल आहेत असा आरोप जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी केलाय . जो पर्यंत हमी भाव , वीज बील माफी , कर्जमाफी होत नाही तो पर्यंत संप चालुच ठेवणार असा ईशारा भैय्या देशमुख यांनी दिलाय . तसेच सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख , सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सदाभाउ खोत यांना जिल्हा बंदीची घोषणा देशमुख यांनी केलीय . या मंत्र्यांच्या गाड्य दिसताक्षणी आपण आडवे पडणार असल्याचे त्यांनी जाहिर केलयं . आज पंढरपूर , माढा , मोहोळ सह जिल्ह्यात संप पाळण्यात आलाय . पंढरपूर मध्ये शेतकर्यांच्या वतीने सरकारला सुबुध्दी मिळावी म्हनुन विठ्ठलाला साकडे घालण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही?”, नारायण राणेंचा सवाल

News Desk

‘भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार’, सेनेची केंद्र सरकारवर टीका!

News Desk

दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का?चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल 

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

मराठा आरक्षणाची ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

पैसा व सत्तेने सर्व काही मिळविता येत नाही

News Desk

शरद पवार यांनी कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी !

News Desk