HW News Marathi
मुंबई

मुंबई मेट्रोचा मासिक पास महागला

मुंबई – मेट्रो च्या मासिक पास आणि परतीचं भाडं (तिकीट) महागलं आहे. या वाढीबाबत मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतली किंवा नाही? याबाबत मुंबई मेट्रो ने साधलेले मौन चर्चेचा विषय बनला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई मेट्रोने उत्तर देत सांगितले की परतीच्या आणि मासिक भाड्याच्या स्लॅबमध्ये वाढ केली आहे.

14 जून 2017 रोजी मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए यामध्ये असलेल्या वादाची सुनावणी असून त्यापूर्वीच मुंबई मेट्रोचे भाडे वाढ करत अप्रत्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान केला आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त करत एमएमआरडीए प्रशासनाकडे मागणी केली आहे की सुनावणीत याबाबीचा उल्लेख करत न्यायालयाचे लक्ष वेधावे. परतीचा प्रवास 5 रुपयांनी महाग झाला आहे तसेच मासिक पासात सुद्धा वाढ झाली आहे. अनिल गलगली यांच्या मते मुंबई मेट्रोचे वाढ करण्याऐवजी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतली असती तर योग्य ठरले असते. अशी वाढ अचानक करत अप्रत्यक्ष मुंबई उच्च न्यायालयास आव्हान देण्याचे काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

देशाला लोकशाही काँग्रेसने किंवा नेहरुंनी दिलेली नाही – नरेंद्र मोदी

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk

महाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद! – उद्धव ठाकरे

Aprna