HW News Marathi
मुंबई

मुंबईतील १२ हजार इमारती पंचाहत्तरीच्या!

मुंबई : भेंडी बाजारातील इमारत दुर्घटनेमुळे मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेला आहे. मुंबईत सन १९४० पूर्वीच्या तब्बल १२ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी न झाल्यास, अशा दुर्घटना रोखणे कठीण होणार आहे.

दरवर्षी मे महिन्यात अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ही यादी जारी केल्यानंतर म्हाडा अधिनियम ९५ अन्वये रहिवाशांना नोटिसा जारी केल्या जातात. या नोटिसांचा पाठपुरावा केला जातो. परंतु रहिवाशी इमारत रिक्त करीत नाहीत. पावसाळ्यात यापैकी एखादी इमारत कोसळते आणि त्यानंतर आम्ही नोटिस दिली होती, असे सांगून म्हाडाकडून हात वर केले जातात. पालिकेकडूनही हीच पद्धत वापरली जाते. परंतु तातडीने पुनर्बाधणी आवश्यक असलेल्या १४ हजार ३७५ इमारती आज मुंबईत आहेत. यापैकी १९४० पूर्वीच्या १२ हजार १२९,१९४० ते ५० या काळातील ९९६, तर १९५१ ते १९६९ या काळातील १,२७७ इमारती आहेत.

मुंबईत १९ हजार ६४२ इमारती होत्या. त्यापैकी पाच हजार २६७ इमारतींची पुनर्बाधणी झाली आहे. यापैकी काही इमारती म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाने बांधल्या आहेत, तर काही इमारती विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)(९) या अंतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. हा वेग खूपच कमी आहे. त्यातच दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे. या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी आवश्यक ठोस धोरण अद्यापही आणले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानपरिषदेच्या चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

News Desk

पोलिसवाल्याच्या पत्नीने टाकला 2 कोटीचा दरोडा

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग

News Desk

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk