HW News Marathi
मुंबई

मुंबईतील १२ हजार इमारती पंचाहत्तरीच्या!

मुंबई : भेंडी बाजारातील इमारत दुर्घटनेमुळे मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेला आहे. मुंबईत सन १९४० पूर्वीच्या तब्बल १२ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी न झाल्यास, अशा दुर्घटना रोखणे कठीण होणार आहे.

दरवर्षी मे महिन्यात अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ही यादी जारी केल्यानंतर म्हाडा अधिनियम ९५ अन्वये रहिवाशांना नोटिसा जारी केल्या जातात. या नोटिसांचा पाठपुरावा केला जातो. परंतु रहिवाशी इमारत रिक्त करीत नाहीत. पावसाळ्यात यापैकी एखादी इमारत कोसळते आणि त्यानंतर आम्ही नोटिस दिली होती, असे सांगून म्हाडाकडून हात वर केले जातात. पालिकेकडूनही हीच पद्धत वापरली जाते. परंतु तातडीने पुनर्बाधणी आवश्यक असलेल्या १४ हजार ३७५ इमारती आज मुंबईत आहेत. यापैकी १९४० पूर्वीच्या १२ हजार १२९,१९४० ते ५० या काळातील ९९६, तर १९५१ ते १९६९ या काळातील १,२७७ इमारती आहेत.

मुंबईत १९ हजार ६४२ इमारती होत्या. त्यापैकी पाच हजार २६७ इमारतींची पुनर्बाधणी झाली आहे. यापैकी काही इमारती म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाने बांधल्या आहेत, तर काही इमारती विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)(९) या अंतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. हा वेग खूपच कमी आहे. त्यातच दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे. या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी आवश्यक ठोस धोरण अद्यापही आणले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग

News Desk

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

मलबार हिलचेही नामांतरण होणार ?

News Desk