HW News Marathi
मुंबई

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

मुंबई | दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांना काही विषेश सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे दहीहंडी पथकांवर काही निर्बंध असणार आहेत. नियम मोडल्यास पोलिसांची कारवाई दोखील होऊ शकते. त्यामुळे आज साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवात काहीसे नियमांचे पालन मात्र बाल गोपाळांना करावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीने सर्व गोविंदा पथकांना सूचना करणारे निवेदन दिले आहे. सोशल मीडियाद्वारे आणि दहीहंडी समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे निवेदन जास्तीत जास्त गोविंदा पथकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या निवेदनात गोविंदा खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गोविंदा पथकांप्रमाणे आयोजकांनाही काही महत्त्वाच्या सूचना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

वाचा काय आहेत दहीहंडी बाबत विषेश सूचना?

  1. दहीहंडी उत्सव आयोजनात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मैदानात/जमिनीवर गाद्या किंवा तत्सम उपाययोजनांचा वापर करावा.
  2. १४ वर्षांखालील गोविंदा थरात नसावा याची वारंवार सूचना द्यावी, तसे आढळल्यास त्या मंडळास थर लावू देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
  3. एखाद्या गोविंदाला मार लागल्यास त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेणे आणि त्वरित उपचारास सुरुवात करावी. तशी व्यवस्था अगोदरच करून ठेवावी.
  4. आयोजकांकडे स्पॉट विमा आहे, याची पडताळणी करण्यात यावी.
  5. आयोजनाच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असावे.
  6. आयोजकांनी बक्षिसांचे जाहीर फलक लावावेत. जाहीर केलेल्या बक्षिसात फेरफार करू नये.
  7. हंडीचा दिवसभराचा कालावधीही स्पष्ट करावा.
  8. आयोजकांनीही आपत्कालीन परिस्थिती ओढवणार नाही याची काळजी घ्यावी.
  9. एकाच वेळी सर्व मंडळांना बोलावू नये. वेळेसाठी मंडळांशी सुसंवाद साधावा.
  10. गोविंदा खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये अशा सूचनांचा समावेश आहे.
  11. आयोजनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, मात्र गोविंदांना प्रथम प्राधान्य द्यावे.
  12. सायंकाळच्या वेळेस पुरेसा उजेड असावा. पिण्याचे पाणी मुबलक असावे आणि जवळपास फिरते शौचालय असावे.
  13. मैदानात चिखल असल्यास तो कमी करण्यास उपाय योजावा.
  14. रस्त्यावर आयोजन असल्यास वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यास लागणारी रीतसर परवानगी घ्यावी, पुरेसे स्वयंसेवक कार्यरत ठेवावे.

तसेच बघ्यांची गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी सुव्यस्था ठेवण्यात यावी. गोविंदा मंडळांना थर रचताना या गर्दीचा त्रास होणार नाही याची दक्षता आयोजकांनी प्राधान्याने घ्यावी. असेही निवेदनात सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाईलप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार

News Desk

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात; जाणून घ्या… ‘या’ मतदारसंघ किती मतदार, मतदान केंद्र

Aprna

मुंबईत बत्ती गुल, ग्रिड फेल्युअरमुळे पूर्ण मुंबईत वीजपुरवठा खंडित

News Desk