HW News Marathi
मुंबई

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

मुंबई | विधानसभा अध्यक्षांविरोधातील सरकारने मांडलेल्या विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध १८ दिवसांपूर्वी विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला होता.

त्याला प्रत्यूत्तर म्हणून फडणवीस सरकारने विरोधकांच्या अविश्वास ठरावावर कोणतीही चर्चा न करता उलट सभागृहात ‘विश्वास’ ठराव मांडला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूरही करून घेण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, इतर वेळी सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनेही यावेळेला सरकारच्या विश्वास ठरावाला अनुमोदन दिले.

सरकारी पक्षाकडून अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव आम्ही सभागृहात ५ मार्च रोजी आणला होता. हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा अशी आम्ही मागणी केली आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. परंतु सरकारने तो अविश्वास ठराव चर्चेला न आणता ‘विश्वास’ ठराव मांडला, असे म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारच्या या खेळीला आपला आक्षेप नोंदवला.

याच मुद्यावरून विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘यापूर्वी सभागृहात असे प्रकार झालेले आहे. काँग्रेसच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला होता आणि तो मंजूर केला होता.

आजही नियमानुसार कामकाज झाले आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपला ‘विश्वास’ ठराव रेटून धरला. यानंतर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची परस्पर विरोधी घोषणाबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

News Desk

मुंबई पोलिसांना लोकल प्रवास मोफत

News Desk

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk
मुंबई

सरकारने लोकशाहीचा खून केला | वळसे पाटील

News Desk

मुंबई | विधानसभा अध्यक्षाविरोधात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर १४ दिवसांनंतर विधानसभा अध्यक्षांनी तो ठराव वाचून दाखवणे गरजेचे आहे. आम्ही पाच तारखेला या ठरावाची प्रत दिली. १९ तारखेला नोटीसीचा कालावधी संपला. २० तारखेला ही नोटीस सभागृहाला वाचून दाखवणे क्रमप्राप्त होते.

परंतु तसे घडले नाही. मुख्यमंत्र्यांनी अचानक अध्यक्षांच्या बाजुने विश्वास दर्शक ठराव मांडला व मंजूर करून घेतला. २००६ साली विलासराव देशमुख असताना असता ठराव आला होता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झालाच नसता. तरीही सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे गरज नव्हती. सरकारने एक चूक केल्यानंतर ती झाकण्यासाठी दुसरी चूक केली. या निमित्ताने सरकारने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला.

Related posts

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

Gauri Tilekar

भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’, दिग्गज नेत्यांचा सहभाग

swarit