HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज (१६ जानेवारी) अखेर तब्बल ९ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. वडाळा डेपोत नुकत्याच झालेल्या बेस्ट कृती समितीच्या मेळाव्यात तब्बल ९ दिवस चाललेला हा संप मिटल्याची अधिकृत घोषणा बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केली आहे. ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ च्या जोरदार घोषणा देत बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला हा विजय साजरा केला आहे. बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांचे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

आज सकाळी ११ वाजता झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या या निर्णयाबाबत बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.

काय म्हणाले शशांक राव ?

  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान ७००० रुपयांची वाढ होणार
  • कनिष्ठ कामगारांचे पगार पुढील महिन्यापासून वाढणार
  • बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी
  • दत्त सामंत यांच्या पुण्यतिथीला आपल्याला न्याय मिळाला हे विशेष
  • न्यायालयातून आम्ही आमच्या हक्काचे मिळवले
  • उद्धव ठाकरे म्हणतात, किती काळ आम्ही बेस्टला मदत करायची ? पैसे कुठून आणणार ?
  • कामगारांना संपविण्याचा प्रयत्न सुरु होता
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat

मंत्र्यांच्या बंगल्या बाहेर काळे कंदील

News Desk

सीएसटी कर्जत लोकलमध्ये गरोदर महिलेला मारहाण

News Desk