HW News Marathi
मुंबई

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

मुंबई | भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ३०० ते ४०० कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. आज भीम आर्मीची वरळी जांबोरी मैदानात सभा होती. मुंबईसह महाराष्ट्रात सभा घेऊ नये म्हणून पोलीस आम्हाला ताब्यात घेत आहेत अशी माहिती भीम आर्मी कडून देण्यात आली आहे.

मनाली हाॅटेल स्टेशन परिसर व आसपासच्या परिसरात पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त मनाली हाॅटेल जवळून भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनील गायकवाड मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे,पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड सचिन पट्टेबहादूर अॅड अखिल शाक्य सोलापूर प्रवीण बनसोडे बुलढाणा यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हाॅटेल येथून पोलीसांनी केली अटक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk

घर अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर, 18 तासांनंतरही ‘ते’ घरी परतलेच नाहीत !

News Desk

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

swarit
राजकारण

हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते !

News Desk

मुंबई | हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे व सक्तीचे कुटुंब नियोजन हाच त्यावरचा उपाय आहे. समान नागरी कायदा आणून ‘हम पाच-हमारे बीस-पचीस’ ही मनमानी बंद केल्याशिवाय मुस्लिमांच्या लोकसंख्येला आळा बसणार नाही. मुसलमानांच्या वाढणार्‍या लोकसंख्येस उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’चा नाद सोडून मुसलमानांप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असा दिव्य विचार काही हिंदुत्ववादी लोक मांडत असले तरी ते चुकीचे आहे. सीमा सुरक्षा दलाने या धोक्याची जाणीव केंद्र सरकारला करून दिली आहे. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे राज्यकर्ते त्याविरोधात कारवाई करणार आहेत की नेहमीप्रमाणे हवेतील तलवारबाजी करणार आहेत? , अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून वाढणाऱ्या लोकसंख्येवर प्रश्न उपस्थित केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

कारणे काहीही असतील, पण येथील बहुतेक मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात सामील होत नाहीत. ते सीमेवरच राहतात. त्यामुळेच ते ‘संशयास्पद’ ठरतात. आताही राजस्थानच्या सीमेवरील मुसलमान, मुस्लिम आहे म्हणून नव्हे तर तेथे त्यांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे आणि तेथे तिचे एकत्रीकरण होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक वाटत आहेत. सीमा सुरक्षा दलाने या धोक्याची जाणीव केंद्र सरकारला करून दिली आहे. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे राज्यकर्ते त्याविरोधात कारवाई करणार आहेत की नेहमीप्रमाणे हवेतील तलवारबाजी करणार आहेत?

हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे व सक्तीचे कुटुंब नियोजन हाच त्यावरचा उपाय आहे. समान नागरी कायदा आणून ‘हम पाच-हमारे बीस-पचीस’ ही मनमानी बंद केल्याशिवाय मुस्लिमांच्या लोकसंख्येला आळा बसणार नाही. मुसलमानांच्या वाढणार्‍या लोकसंख्येस उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’चा नाद सोडून मुसलमानांप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असा दिव्य विचार काही हिंदुत्ववादी लोक मांडत असले तरी ते चुकीचे आहे. याच वाढत्या मुसलमानी लोकसंख्येने एकदा देशाचे विभाजन झाले व तीच लोकसंख्या अधूनमधून देशात अशांतता, अस्थिरता निर्माण करीत असते. आताही एक नवा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. हिंदुस्थान-पाक सीमेवर राजस्थानात मुस्लिमांची संख्या झपाट्याने म्हणजे बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत असल्याची चिंता ‘बीएसएफ’ म्हणजे सीमा सुरक्षा दलाने व्यक्त केली आहे. ‘बीएसएफ’ने हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयास पाठवला व कठोर उपाययोजनांच्या सूचना केल्या. हा एक प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेला सावधानतेचा इशारा आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील जैसलमेर या भागातील मोहनगड, नयना, बहला, पोखरण, साम, तनोट या ठिकाणी इतर समाजाच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या 22 ते 25 टक्के जास्त वाढल्याचे ‘बीएसएफ’च्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या परिसरातून राजस्थानी सांस्कृतिक खुणा नष्ट होत आहेत आणि या भागात उत्तर प्रदेशातील देवबंदमधील

मौलानांचे दौरे वाढले

आहेत असेही ‘बीएसएफ’ने म्हटले आहे. तूर्त या भागात धार्मिक, सामाजिक शांतता असली आणि राष्ट्रविरोधी कारवायांची चाहूल लागलेली नसली तरी भविष्यात काहीही घडू शकते. राजस्थानातील हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा नेहमीच संवेदनशील राहिली आहे. त्याच भागात जेव्हा मुस्लिम लोकसंख्या अचानक बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने वाढते तेव्हा तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकाच ठरतो. आसाम, पश्चिम बंगाल ही राज्ये याच पद्धतीने गेल्या काही दशकांत मुस्लिमबहुल बनली आहेत. त्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट मंडळींना जबाबदार धरणारेच आज केंद्रात आणि राजस्थानात सत्तेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच बेकायदा नागरिकांना देशातून हाकलून लावण्याची आणि घुसखोरांना देशात पाऊल ठेवू न देण्याची भाषा करीत असतात, मग आता राजस्थान सीमेवर अचानक जी ‘हिरवी घुसाघुशी’ सुरू आहे त्याचे काय? हिंदुस्थानची पूर्वोत्तर सीमा मुस्लिम लोकसंख्येच्या विळख्यात आधीच अडकली आहे. कश्मीर खोर्‍यात स्थानिक मुस्लिमांसोबतच पाकिस्तानी घुसखोर आणि दहशतवाद्यांनीही बस्तान बसवले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संस्था यांचे हे हिंदुस्थानविरोधातील जुनेच कारस्थान आहे. सीमावर्ती राज्ये मुस्लिमबहुल करायची आणि देशातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे ‘छुपे बॉम्ब’ पेरून ठेवायचे. मुस्लिम मतांच्या लाचारीपायी आजवरच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र विद्यमान राज्यकर्तेही त्यापेक्षा वेगळे नाहीत हेच

राजस्थानच्या सीमा भागातील

वेगाने वाढणार्‍या मुस्लिम लोकसंख्येने दाखवून दिले आहे. तलाकसारख्या मुस्लिम समाजातील अनिष्ट रूढीविरुद्ध गंभीर आणि खंबीर पाऊल उचलणारे राज्यकर्ते हिंदुस्थानातील मुस्लिमांची अनिर्बंध आणि नियोजनबद्ध लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा दांडपट्टा फिरवण्याचे धाडस दाखविणार आहेत का? राजस्थानातील पोखरणमध्येच हिंदुस्थानने दोनदा अणुस्फोट घडवून आपले आण्विक सामर्थ्य पाकिस्तान आणि जगाला दाखवून दिले. आज त्याच पोखरणमध्ये वाढत्या मुस्लिम लोकसंख्येचे ‘स्फोट’ होत आहेत. पुन्हा ज्या गोपनीय पद्धतीने आपण पोखरण-1 आणि पोखरण-2 घडवले त्याच छुप्या पद्धतीने मुस्लिम लोकसंख्येचे हे ‘पोखरण’ घडविले जात आहे. देशातील मुस्लिम बांधवांना आम्ही नेहमीच मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याविषयी सांगत असतो. कारणे काहीही असतील, पण येथील बहुतेक मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात सामील होत नाहीत. ते सीमेवरच राहतात. त्यामुळेच ते ‘संशयास्पद’ ठरतात. आताही राजस्थानच्या सीमेवरील मुसलमान, मुस्लिम आहे म्हणून नव्हे तर तेथे त्यांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे आणि तेथे तिचे एकत्रीकरण होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक वाटत आहेत. सीमा सुरक्षा दलाने या धोक्याची जाणीव केंद्र सरकारला करून दिली आहे. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे राज्यकर्ते त्याविरोधात कठोर कारवाई करणार आहेत की नेहमीप्रमाणे हवेतील तलवारबाजी करणार आहेत?

Related posts

#RamMandir : अयोध्येत राम मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटनांची सभा

News Desk

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

#LokSabhaElections2019 : शिवसेना-भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग !

News Desk