HW News Marathi
मुंबई

शिक्षण उपसंचालकाला ११वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव.

मुंबई शिक्षण उपसंचालकाना मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शेकडो विद्यार्थांच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव घालण्यात आला ह्या घेरावा दरम्यान शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण ह्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यसरकार विद्यार्थांचे भवितव्य अंधारमय करत आहे.ह्यामुळे विद्यार्थांचे मानसिक खच्चीकरण होत आहे तसेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तांत्रिक बिघाडमुळे लाखो विद्यार्थांचा अमुल्य वेळ वाया गेलेला आहे व असंख्य विद्यार्थी प्रवेश प्रक्रीये पासून वंचित राहण्याचा धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे.विद्यार्थांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ 29 जून २०१७ पर्यंत वाढवून दिली अशी आक्रमक मागणी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे अध्यक्ष अॅड.अमोल मातेले यांनी केली तसेच शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी असे सांगितले कि ११वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढ देण्यात येईल, ह्या संदर्भात मंत्रालयात मंत्री महोदयांनी तातडीची बैठक बोलविण्यात आलेली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदिजी ह्यांच्या डिजिटल इंडियाचा घोषवारा हवेतच विरला त्याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महाराष्ट्रातील ११वी प्रवेश गोंधळ. ह्या गोंधळा मुळे विद्यार्थी आणि पालकान मध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. जेथे संपूर्ण भारतातील जनमानसाचे करोडो रुपये खर्च करून“डिजिटल इंडियाचे वारे मोदि सरकार कडून वाहत असण्याचे खोटे चित्र भारतात वटवत असताना. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थांचे फक्त वेबसाईट च्या काही तांत्रिक करणामुळे भविष्य अंधारमय झालेले आहे, त्यामुळे डिजिटल इंडियाचे ची पोलखोल व करोडो करदात्यांचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र ह्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र समोर आलेले आहे ,ह्या गोंधळासाठी संपूर्ण पणे शिक्षण खाते आणि नासा कंत्राटदार जवाबदार आहे. ह्यासर्वाची गंभीर दखल घेत लाखो विद्यार्थांच्या भविष्यासाठी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ने शिक्षण उपसंचालकाला घेराव घालून जाब विचारला तसेच ऑनलाईन प्रवेशाची मुदत वाढवून मिळावी ह्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.

(१)अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा नव्याने राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या अकरावी च्या विविध शाखांच्या प्रवेशा चा महत्वाचा टप्पा तो म्हणजे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.यंदा च्या वर्षी हे कंत्राट नवीन कंपनी ला पुरवण्यात आले असुन तरी सुद्धा प्रवेश प्रक्रीयेत विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणी पासुन विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणीना सामोरे जावे लागत असुन विद्यार्थी व पालक यांच्या मधेय एक प्रकारचे गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे ,असे अॅड.अमोल मातेले यांनी सांगितले.

(२) असंख्य विद्यार्थी सध्याच्या घडीला आपला अर्ज सादर करू शकले नाही त्यामुळे चिंता तूर पालकांचे व विद्यार्थ्यांची गर्दी आपसुकच शाळा व सायबर कॅफे च्या भोवताली दिसत आहे.सध्याच्या घडी ला प्रवेश प्रक्रीये मधेय अनेक त्रुटी आढळत असुन प्रशासना कडून कोणतीच खंबीर भुमिका घेतली जात नसुन त्या वर मलमपट्टी करून प्रवेश प्रक्रीये मधेय चालढकल करत आहे. सर्व्हर डाऊन व सर्व्हर नॉट रिचेबल असे नाना विविध समस्यांचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.शिक्षण विभागाकडून चाललेल्या गोंधळा ला विद्यार्थ्यांचा नाहक बळी जात असून या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुमारे ७ महिन्या वर आले आहे.या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ ४ पूल दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला

swarit

“सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली

Gauri Tilekar

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna