HW News Marathi
मुंबई

काँग्रेसचा माजी आमदार भाजपाच्या गळाला

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह आता भाजपाच्या गळाला लागले आहेत़ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत गटातील राजहंस सिंह तब्बल ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पक्षातील उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. सिंह यांनी महापालिकेत आठ वर्षे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती. राजहंस सिंह शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी भाजपाचा रस्ता धरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने सिंह यांना कालिना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य असणारा हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.

Attachments area

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लग्नानंतर जीन्स घालण्यास विरोध करण्याऱ्या पतीवर गुन्हा

News Desk

आज मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

आरेतील आग जाणीवपूर्वक लावली, अग्निशमन दलाचा अहवाल जाहीर

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

“गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं”-छगन भुजबळ

News Desk

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Aprna

धक्कादायक! बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून ५ देशातल्या लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

News Desk