HW News Marathi
मुंबई

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण

मुंबई | कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पाने बुधवार २६ डिसेंबरला अजून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मेट्रो ३ प्रकल्पाच्या खोदकामात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणारी दुसरी टनेल बोरिंग मशीनद्वारे २६ डिसेंबर रोजी मरोळ स्थानकासाठी बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी या मशीनद्वारे पाली मैदान ते एअरपोर्ट येथील बोगदा खोदून पूर्ण केला आहे. यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी सारिपूत नगर येथून या मशीनद्वारे ५६८ मीटरचा बोगदा खोदून पूर्ण झाला होता. यामध्ये सारीपूत नगर ते सीप्झपर्यंतचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आता वर्षाच्या अखेरीस मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पाने अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. यासाठी जवळपास २५० इंजीनिअर, तंत्रज्ञ, कुशल कामगार यांनी मिळून हे कार्य पूर्णत्वास नेले आहे.

वैनगंगा २ नावाच्या टनेल बोरिंग मशीनने १२५ दिवसात भुयारीकरणाचे काम पूर्ण करुन ही मशीन सीप्झ स्थानकातून बाहेर पडली आहे. ही मशीन तब्बल ९२ मीटर लांबीची असून दररोज जवळपास १० ते १२ मीटरचे खोदकाम करुन एका सिमेंटच्या मोठ्या रिंगने त्या बोगद्याला आकार देण्याच काम केले जाते. मेट्रो ३ सुरु झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळ ते आरे कॉलनीपर्यंत असेल तर पुढे तो वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ ला जोडला जाईल. तर मेट्रो ६ च्या प्रकल्पाने स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मार्गाला जोडला जाईल. यामुळे बिजनेस हब म्हणून ओळखले जाणारे एमआयडीसी आणि सिप्झ देखील मेट्रोमुळे जोडले जातील.

जे सध्या उपनगरीय रेल्वेने जोडलेले नाही. आतापर्यंत एमएमआरसीने १५ किमीचे भूयारीकरण पूर्ण केले आहे. ज्यासाठी एकूण १७ टेनेल बोरिंग मशिन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. “मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. यापुढील आव्हानात्मक कामगिरीसाठी आम्ही तयार आहोत. अभियंते, कामगार, भागधारक या सर्वांमुळेच हे काम पूर्ण होऊ शकले. या सर्वांच्या सहाय्यानेच हा मैलाचा टप्पा आम्ही गाठू शकलो. मरोळ नाका ते सिप्झ व्हाया एमआयडीसी या मेट्रो मार्गाच्या पॅकेज ७ च्या बांधकामाचा कंत्राट एल अँड टी आणि शांघाय टनेल इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले आहे”, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले

हा भूमिगत मार्ग एकूण ७.७ किमी लांबीचा आहे. त्यातून जवळपास ११ लाख क्युबिक मीटर माती बाहेर निघण्याची शक्यता कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. या मातीला तळवली-पायस या ठिकाणी नेण्यात येणार आहे. यासाठी सरकारी जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत बोगद्यातून निघालेल्या जवळपास ४.२ लाख क्युबिक मीटर मातीचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाहिरनामा समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची माहिती

News Desk

शिवस्मारकाची रचना बदलणार ?

News Desk

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk