HW News Marathi
मुंबई

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

मुंबई – काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांनी रहात्या घरी फाशी लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. शेलार घरी एकटे असताना त्यांनी आत्महत्या केली. पत्नी बाहेरून आल्यानंतर शेलार यांचा मृतदेह लोंबकळत होता. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आलं. शेलार यांचा मृतदेह सध्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आला आहे. शेलार यांनी आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट होवू शकले नाही. प्रवक्ते म्हणून शेलार यांनी प्रभावी कामगिरी केली होती. अनेक वेळा त्यांनी प्रवक्ता म्हणून काँग्रेसची बाजू सक्षम पणे मांडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk

शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते – शरद पवार  

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk
महाराष्ट्र

हो.. घोडेबाजार तर होणारच…..अजित पवार 

News Desk

– शिवसेना भाजपच्या नितीवर अजितदादांचा प्रहार

मुंबई महापालिकेतील वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ही बाब अपेक्षितच होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत आगामी काळातही घोडेबाजार हा होणारचं असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आणि शिवसेनेत एका सदस्स्याचेच अंतर आहे. त्यात महापौर हा भाजपचाच होईल असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं मनसेचे ६ नगरसेवक फोडले. हीच बाब आता भाजपकडून होण्याची दाट शक्यताही पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळा घोडेबाजार आणि फोडाफोडीचेच राजकार मुंबई महापालिकेत पहायला मिळालं तर आश्चर्य नको असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेवर पवार यांनी जोरदार टिका केली. भिती पोटी शिवसेना सत्ते आहे. सत्तेतून बाहेर पडले तर त्यांचे आमदार फुटण्याची भिती शिवसेनेला आहे. शिवसेनेची अवस्था “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” अशी झाल्याचा टोला ही त्यांनी लगावला. नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेचा आमदार भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार करतो. त्यांची तिकीटे वाटतो आणि आपल्याच पक्षाकडे पाठ फिरवतो. हे चित्र केविलवाणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते तर आमदाराची अशी हिंमत झाली असती काय? असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन…

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Aprna

राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

News Desk