HW News Marathi
मुंबई

दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’चा दिलासा

मुंबई : सतत गैरहजर राहिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून परीक्षेला नाकारण्यात येते. अशा विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत अर्थात आयडॉलमध्ये संधी देण्यात आली असल्याने या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. काही विद्यार्थ्यांना विविध कारणास्तव रेग्यूलर लेक्चरला बसने महाविद्यालयात वेळेवर येणे श्क्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार १० मेला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. ५००हून अधिक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्दल घडावी म्हणून पश्चिम उपनगरातील अनेक महाविद्यालयांनी त्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला होता. ६० टक्क्यांहून कमी हजेरी असल्याने पार्ले येथील एनएम कॉलेज, मिठीबाई, केईएस श्रॉफ, तर दक्षिण मुंबईतील विल्सन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली होती. यापैकी अनेक विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई विद्यापीठाकडे मदतीची मागणी केली होती. अशा विद्यार्थ्यांना परत परीक्षेला बसण्याचे आदेश देणे, हे नियमांमध्ये बसत नसल्यामुळे विद्यापीठाने संबधित विद्यार्थ्यांना आयडॉलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः खा.अशोक चव्हाण

News Desk

पाचव्या दिवशीही मध्य रेल्वेचा खोळंबा

News Desk

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk