HW News Marathi
मुंबई

राज्यपाल नियुक्त आमदार नको म्हणून राज्यपालांच्या निर्णयाला फडणवीसांचा पाठिंबा

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवरून राजकारण सुरू आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संविधानाच्या तत्वांचे पालन करत राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो. शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल, असा टोलाही लगावला आहे. आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे ब्राह्मण समाजात पडसाद

News Desk