HW News Marathi
मुंबई

आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवा बंद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालपासून (२२ मार्च) आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली होती. दरम्यान, आंतरराज्यीय विमान सेवाही बंद करावी अशी सर्व स्तरांकडून मागणी होत होती. आज (२३ मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन करुन कौतूक केले होते. तसेच, आंतरराज्यीय विमान सेवा बंद करावी अशी मागणीही यावेळेस राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यांची ही मागणी सफल झाली असून आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवाही बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र हा संपूर्ण लॉकडाऊन असून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही ८९ वर पोहोचली आहे. ही संख्या वाढू नये यासठी राज्यसरकार अनेक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊयात आणि घरातच राहूयात. जमावबंदीचे उल्लंघन न करता देशाला या जागतिक संकटापासून वाचविण्यासाठी एकत्रित येत प्रयत्न करुयात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रविवारी रेल्वेच्या विविध कामांसाठी मेगाब्लॉक

News Desk

पहिल्या ट्विटमध्ये राज यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

News Desk

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk