HW News Marathi
मुंबई

आज देखील ती धावली…   

मुंबई | भारतातल्या पहिल्या सुपरफास्ट रेल्वेला म्हणजेच डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला १ जून २०१८ रोजी ८८ वर्षे पूर्ण झाली. दक्खनची राणी म्हणून ओळखली जाणारी ही रेल्वे १ जून १९३० रोजी महाराष्ट्रातील २ महत्वाच्या असणा-या शहरांच्या सेवेसाठी रुळावर उतरली. या निमित्ताने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनस येथे कामगारांसह प्रवाश्यांनी दख्खनच्या राणीचा ८८ वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

भारताची व्यापारी राजधानी म्हणून मुंबईच्या वाढीनंतर, डेक्कन क्वीन ही पुण्यात राहणा-या लोकांसाठी उत्तम वाहतूक व्यवस्था आहे. मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास या रेल्वेने १ तासाहून कमी केला आहे. प्रारंभीपासून रेल्वेने अनेक सुधारणा करत प्रवाशांच्या सोईसाठी उच्च दर्जाचा आराम देण्याकडे ही या रेल्वेने भर दिला आहे. सध्या, डेक्कन क्वीन ४ एसी चेअर कार, एक बुफे कार, १०- द्वितीय श्रेणी चेअर कार आणि दोन सेकंदांच्या कमांड ब्रेक व्हॅनसह १७ कोचसह चालते हे या डेक्कन क्विनचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी २ तरुणांचा मृत्यू

News Desk

एसटी आगारातून खाजगी वाहतूकीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करा

News Desk

कर्जमाफीची नवी फॅशन आलीय – व्यंकय्या नायडू

News Desk
कृषी

प्रहार शेतकरी संघटनेचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा   

News Desk

करमाळा | भाकड जनावरे सांभाळण्यासाठी अनुदान गोशाळेस न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यांसह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने करमाळा तहसील कार्यालयावर वाजतगाजत भाकड जनावरांचा मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये मोठया प्रमाणावर शेतकरी सामील झालेले पहायला मिळाले.

आजचा शेतकरी अनेक संकटाचा सामना करतोय शेतात पिकलेल्या मालाला भाव नाही तर दुसरीकडे दुधाला कमी दर यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. दुधाला ३५ रु लिटर दर मिळावा व भाकड जनांवराचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे या मागणीसाठी आज करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मुक्या जनावरांच्या तोंडातला घास काढून तो गो-संवर्धन करणार्‍या लबाड संस्था चालकांच्या घशामध्ये घालण्याचा घाट भाजपा सरकारच्या सरकारने घातला आहे.

गो-हत्या बंदी कायदा करून गो-शाळांना मान्यता देवून या शाळांमध्ये शेतकर्‍यांनी आपली भाकड जनावरे दाखल करून थेट शेतकर्‍यांना अनुदान न देता गो-शाळा चालकांना अनुदान देण्याचे काम केले आहे. भाजपा सरकारने जनावरांच्या नावाखाली गो-शाळा चालकांना आयते कुरण उपलब्ध करून दिले. त्यामध्ये प्रत्येक वर्षाला गो-शाळा संस्था चालकांना राज्यामध्ये रुपये ३४ कोटी अनुदान देण्याचे काम हे सरकार करते. म्हणजे प्रत्यक्षात शेतकरीही उपाशी व त्यांच्याकडील भाकड जनावरेही उपाशी ठेवण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अतुल खूपसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला .

Related posts

”पेसा”मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी

News Desk

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

News Desk

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

News Desk