HW News Marathi
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज! – दीपक केसरकर

Aprna

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग; विद्यार्थ्यांनी केला स्वच्छ मुंबईचा संकल्प

Aprna
राजकारण

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk

नवी दिल्ली । पश्चिम बंगालमध्ये दिव्यांगांसाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांनी क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याची धमकी दिली आहे. दिव्यांगांच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे वक्तव्य करून सुप्रीयो यांनी स्वतःवर वाद ओढवून घेतला आहे.

आसनसोल येथे दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यावश्यक असलेल्या साहित्य वाटपासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमातील व्यक्तींपैकी एक व्यक्ती सतत हालचाल करत होता. त्याच्या सततच्या हालचालींमुळे चिडून बाबुल सुप्रियो यांनी भर कार्यक्रमात त्या व्यक्तीला चक्क पाय तोडण्याची धमकी दिली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये बेताल वक्तव्ये करून जनतेचा रोष ओढवून घेण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांनी दिव्यांगांच्या कार्यक्रमात जाऊन अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आहे.

Related posts

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचे चाललेले राजकारण थांबले तरी पुरे | ठाकरे

News Desk

जितेंद्र आव्हाडांनी आमदाराकीचा दिला राजीनामा; जयंत पाटील म्हणाले…

Aprna