HW News Marathi
मुंबई

ओला-उबर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर

मुंबई | गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओला उबर टॅक्सीचालकांनी तब्बल १२ दिवस संप पुकारला होता. ज्यामध्ये मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील ओला उबर टॅक्सीचालक सहभागी झाले होते. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा होऊनही कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.

‘सरकारी पातळीवरील चर्चा होउनही आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने, तसेच दोन ते तीन वेळा मीटींग घेऊन आश्वासन देउनही ओला, उबर कंपन्यांकडून कुठलेही आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर पुन्हा संप करण्याची वेळ आली आहे. यामध्ये १७ नोव्हेंबरपासून संप पुकारण्यात येईल तर १९ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात हा संप पुकारण्यार येणार आहे. तब्बल ६० हजार गाड्यांचे चालक मालक या संपात सहभागी होतील. ‘कॅब चालकांना चांगला परतावा मिळावा, ऑनलाईन कॅबचं किमान भाडं १०० ते १५० रुपये असावं, प्रति किलोमीटर १८ ते २३ रुपये भाडं लावावं’, अशा मागण्या ओला-उबर चालकांनी केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

#Lockdown 2: भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , पंतप्रधानांची मोठी घोषणा

News Desk

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

swarit