HW News Marathi
मुंबई

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आनंदावर ‘या’ निर्णयामुळे विरझण !

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत दिवसांतील कामकाजाच्या वेळेत वाढ होणार, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सर्व कामकाजाचे नवे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत आता पाऊण तासाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळए जरी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी रोजच्या कामाच्या वेळेत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू दिसू शकतो.

२९ फेब्रुवारी, २०२० पासून ‘फाइव्ह डे वीक’चा नवा निर्णय लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसलेल्या सरकारी कार्यालयांची यादीही शासन निर्णयासोबत देण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे सरकारी कार्यालयासाठी ५ दिवसांचा आठवडा असताना, दुसरीकडे काही सरकारी कार्यालये यातून वगळण्यात आली आहेत.

मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयांच्या वेळा समान असणार

मुंबईतील कार्यालयाच्या कामकाजांची वेळ स.९.४५ ते सायं.५.३० अशी आहे. त्यात बदल होत आता ती स.९.४५ ते सायं. ६.१५ अशी होणार आहे. तसेच, शिपायांसाठी कामाची वेळ स.९.३० ते सायं. ६.३० अशी असणार आहे. मुंबईतील बाहेर असणाऱ्या कार्यालयांची वेळ सध्या स. १० ते सायं. ५.४५ अशी असून आता पाच दिवसांचा आठवडा केल्याने मुंबईतील कार्यालयांप्रमाणेच वेळ असणार आहे. काही शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही त्यात शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलिस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

शेलार, ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात

swarit