HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्रातील आकडा ६३ वर, गर्दी कमी न झाल्यास लोकल सेवा बंद करावी लागेल- आरोग्यमंत्री

मुंबई | जगभरात पसरलेल्या ‘कोरोना’ व्हायरस हा आता भारतातही आपले हातपाय पसरत असल्याचे चित्र आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २७४ वर जाऊन पोहोचल्यामुळे देशासाठी हा अत्यंत मोठा चिंतेचा विषय बनला आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या देखील थेट ६३ इतकी झाली आहे. कालपर्यंत (२० मार्च) ५२ असलेला कोरोनाबाधितांच्या या आकड्यात आता काही तासांतच मोठी वाढ झाल्याने राज्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर आज (२१ मार्च) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. कोरोनाच्या या वाढलेल्या ११ रुग्णांपैकी १० जण मुंबईचे तर १ जण पुण्याचा आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्यापैकी ८ जण हे परदेश प्रवास करून आलेले असून ३ जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, ६३ कोरोना बाधित लोकांपैकी १२-१५ जणांना संसर्गातून या रोगाची लागण झाली आहे आणि बाकी सगळ्यांना परदेशातून आल्याने लागण झाली असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच, गर्दी कमी करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे ऑफिसेसने वर्क फ्रॉम होमचा पर्यायच निवडावा. तसेच, कोरोनाचा विषाणू हा एसीमध्ये जास्त काळ टिकतो त्यामुळे घरी किंवा ऑफिसेसमध्ये पंख्याच्या वापर करा, दारे खिडक्या उघड्या ठेवा. हा कोरोनाचा विषाणू उन्हात तासा-दोन तासांत मरतो अशी माहितीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात अजूनही कोरोना हा स्टेज २ वरच आहे त्याला पुढे जाऊ न देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये टेस्टींग लॅब उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, सार्वजिनिक वाहतूक करणे टाळावे परंतु दर गर्दी कमी झाली नाही तर लोकल सेवाही बंद करावी लागेल असेही त्यांनी नमुद केले. दरम्यान, कोरोनाच्या या अवकाळी संकटाने अर्थकारणावरही परिणाम होत आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला शक्यत्या निधीची मदत करावी अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली. WHO च्या सर्व सुचनांचे पालन करा असे आवाहनही आरोग्यनंत्र्यांनी जनतेला केले आहे. केंद्र सरकारसोबत संपुर्ण महाराष्ट्र असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे या जागतिक युद्धाला सगळ्यांनी एकत्र सामोरे जावे असे आवाहनही यावेळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk