HW News Marathi
मुंबई

अवघ्या चार मिनिटांत २२ जणांचा बळी

मुंबई: सकाळी कार्यालयात पोहोचण्याची वेळ झालेली. परंतु पावसाचा जोर कमी होत नव्हता. आडोशासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिज हाच पर्याय शिल्लक. अशात चार लोकलमधील हजारो प्रवाशांची गर्दी आली. मागे-पुढे जाण्यासाठी इंचभर जागा शिल्लक नसल्याने सहाजिक रेटारेटी झाली. त्यात सहा फूट अरूंद पुलावरून काहीजण एकमेकांच्या अंगावर पडेल. तिथेच मोठा अनर्थ झाला.

काहीतरी घातपात झाल्याची अफवा उठली जो-तो वाट मिळेत त्या दिशेने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. कोणी एकमेकांच्या अंगावरून उड्या मारून बाहेर पडत होते तर कोणी छताला लटकले होते. या गदारोळात काहींचा दम कोंडला. क्षणार्धात २२ जणांचे प्राण गेले.एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील हा थरारक प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या रेल्वे स्टेशनवर गर्दी नित्याचीच परंतु पावसामुळे गर्दी वाढत गेली. त्यातून हा अपघात झाला. अनेकजण या धक्काने भयभीत झाले आहे. शेजारील नागरिकदेखील किंचाळ्या ऐकून हदरून गेले. अवघ्या चार मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धोबी तलाव मधील एस एस गायकवाड रोड प्रकाशझोत

swarit

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk

सरकारला धनगर समाजाला आरक्षण दयायचंच नाही !

News Desk