HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या तापमानात वाढ

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात घसरलेला तापमानाचा पारा आता हळूहळू पुन्हा वाढत आहे. मुंबईत मंगळवारी (१२ फेब्रुवारी) ) किमान तापमान १७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके होते. यामुळे मुंबईत दिवसभर जाणवणारा गारवा कमी झाला आहे.

नागपूर येथे ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे आहे. तर डहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे.आज (१३ फेब्रुवारी) मध्य महाराष्ट्रात तर उद्या (१४ फेब्रुवारी) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी गरपिटी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट

News Desk

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अपेक्षित वेळेच्या आत पूर्ण केले जाईल! – मंत्री उदय सामंत

Aprna

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

News Desk