HW News Marathi
मुंबई

इंद्रायणीकाठी विवाहितेसह प्रियकराने संपविले जीवन

पुणे : संत ज्ञानोबा माऊलींची कर्मभूमी असलेल्या आळंदीत शनिवारी दुपारी एक थरारक घटना उघडकीस आली. प्रेम प्रकरण यशस्वी होऊ शकत नसल्यामुळे धुळ्यातील एका विवाहितेने प्रियकरासह विषप्राशन करून जीवन संपविले. या घटनेपूर्वी आळंदी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी यातील तरुणीने कुटुंबियांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती. राहुल पाटील (वय ३५, रा. डागुर्ण, ता. सिंदखेडा, जिल्हा धुळे) आणि रीना गिरीगोसावी (वय २५, रा. धुळे) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. हे दोघेही धुळ्यात राहणार होते. गेल्या चार दिवसांपासून ते घरातून बेपत्ता होते. शनिवारी दुपारी त्यांचे मृतदेह इंद्रायणीकाठच्या झुडूपात आढळले. त्यांनी शुक्रवारी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मृतदेहांशेजारी विषारी औषधाची बाटली आढळली. त्यावरून त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, यातील मृत रीना विवाहित होती. मात्र, गेल्या काही काळापासून तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते. आत्महत्येपूर्वी रीनाने घरच्यांना फोन करून या संबंधांची माहिती दिली. तसेच आत्महत्या करत असल्याचेही सांगितले होते, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मखरांची १८ वर्षांची परंपरा, आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर

swarit

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

शमिता शेट्टीचा जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात

swarit