HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

मुंबई |भांडुप पश्चिममधील सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व अग्रवाल रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले.

सह्याद्री विद्यामंदिर शाळेत आज दुपारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दरम्यान खिचडी खाल्ल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला पोटात मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची मुलुंडचे आमदार तारा सिंग यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे.

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून जवळपास १९७ विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत विद्यार्थिनीचे नाव चांदणी साहिल शेख (१२) असे आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या औषध आणि अन्न पदार्थांवर प्रश्नचिन्हे उभे राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

News Desk

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk

केंद्राचा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा, उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

News Desk