HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

मुंबई |भांडुप पश्चिममधील सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व अग्रवाल रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले.

सह्याद्री विद्यामंदिर शाळेत आज दुपारी खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दरम्यान खिचडी खाल्ल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला पोटात मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची मुलुंडचे आमदार तारा सिंग यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे.

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून जवळपास १९७ विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत विद्यार्थिनीचे नाव चांदणी साहिल शेख (१२) असे आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या औषध आणि अन्न पदार्थांवर प्रश्नचिन्हे उभे राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गॅस कर्मचार्‍याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप

News Desk

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

शिक्षकांवर विद्यार्थ्याने केला कोयत्यानी हल्ला

News Desk
देश / विदेश

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

अगरताळा | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या वाजपेयी यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत नसल्याचे एम्स रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये माध्यमातून सांगितले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात भारतीय प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. परंतु काही वेळातच तथागत रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली आहे.

https://twitter.com/tathagata2/status/1029975209766539264

Related posts

आता समलैंगिक विवाहांसाठी लढाई

Gauri Tilekar

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk