HW News Marathi
मुंबई

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना धमक्यांचे फोन

मुंबई | अनधिकृत विकासकामांच्या विरोधात भुमिका घेतल्याने आपल्याला अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती उदय सामंत यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे. अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे उदय सामंत यांनी या पत्रात लिहिले आहे.

माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर काही ठोस पावले उचलावीत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे उदय सामंत यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिली असल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाढत्या बेरोजगारीचे वास्तव लपवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वेक्षणच बंद केले

News Desk

राणीबागेसाठी पेंग्विनचा पायगुण शुभ

News Desk

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

Gauri Tilekar
महाराष्ट्र

अग्निशमन दलाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन  

News Desk

पुणे | रमजानचा महिना हा इस्लाम धर्मासाठी पवित्र समजला जातो. याच महिन्यात सर्व मुस्लिम समाज महिनाभर रोजा पाळतात. दिवसभर रोजा ठेवत सायंकाळी नमाजच्या वेळी अन्न पाणी ग्रहण करुन रोजा सोडतात. या महिन्यात समाजातील विविध जाती-धर्मातले लोक एकत्र येत बंधुत्वाचे प्रेमाचे नाते दृढ करण्यासाठी मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.

पुण्याच्या अग्निशमन दलमध्ये असाच इफ्तारचा कार्यक्रम मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने अग्निशमन दलाचे जवान एकत्र येतात व खेळीमेळीचे उत्साही वातावरण राहते. यावेळी दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे तसेच विभागीय अधिकारी सुनिल गिलबिले, सहायक अधिकारी दत्तात्रय नागलकर, केंद्र अधिकारी सुभाष भिलारे व तांडेल राजाराम केदारी आदी उपस्थित होते.

यावेळी जवान शौकत शेख म्हणाले, “अशाप्रकारे एकत्र येत आमचे काम करण्याचे मनोबल उंचावते. अशा ठिकाणी जवान म्हणून काम करताना सर्व धर्म समभाव हेच ह्दयात भिनलेले असते. आग आपत्ती वेळी अडकलेले लोक कोण अथवा घर कोणाचे हा विचार ही मनाला स्पर्श करीत नाही. जिवित व मालमत्तेचे रक्षण हेच एक ध्येय समोर असते असेही ते यावेळी म्हणाले.

Related posts

राज्यात चित्रपटगृह सुरु करण्याच्या विचारात राज्य सरकार, अमित देशमुखांनी दिली माहिती

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निधीचा फायदा प्रत्यक्षात दुसरे पक्ष घेतात – गजानन कीर्तिकर

Aprna

अजित पवारांचा बांध फूटला, शरद पवारांची बदनामी झाली म्हणून राजीनामा !

News Desk