HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने

मुंबई | नेरळ स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा मोठा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या आणि ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने आहे. त्यामुळे, मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. आज (१९ जून) सकाळी ६ च्या सुमारास दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने आता कर्जत येथून दुसरे इंजिन पाठविण्यात आले असून ते इंजिन बसविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

News Desk

सॅनिटरी पॅडस वरीलGST(कर) रद्द करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे GST भवनवर आंदोलन

swarit

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk