HW News Marathi
मुंबई

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई | गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असे या १२ वर्षीय दुदैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. तर जवळपास ५० ते ६० मुलांना रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या औषधांमुळे ही विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून शाळेतील मुलांना रुग्णालयात उलट्यांचा त्रास होत असल्याने प्रकृती बिघडल्याने त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले गेल. ही सर्व मुले एकाच शाळेतील असल्याचे समोर आले आहे. एका मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. परंतु या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या जळजळ होऊ लागली. राजावाडी रुग्णालयात या मुलांना अॅन्टीबायोटीक्स देण्यात दिले आहे. परंतु मुलांना नक्की कशातून विषबाधा झाली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना दिलासा!

News Desk

नो पार्किंग गाड्यांवर कारवाई करण्यासाठी ‘बाईक पे चर्चा’

News Desk