HW News Marathi
मुंबई

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई | गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असे या १२ वर्षीय दुदैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. तर जवळपास ५० ते ६० मुलांना रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या औषधांमुळे ही विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून शाळेतील मुलांना रुग्णालयात उलट्यांचा त्रास होत असल्याने प्रकृती बिघडल्याने त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले गेल. ही सर्व मुले एकाच शाळेतील असल्याचे समोर आले आहे. एका मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. परंतु या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या जळजळ होऊ लागली. राजावाडी रुग्णालयात या मुलांना अॅन्टीबायोटीक्स देण्यात दिले आहे. परंतु मुलांना नक्की कशातून विषबाधा झाली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नारायण राणेंनी ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वत: हून पाडण्यास केली सुरुवात

Aprna

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil

ठाणे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन

News Desk
देश / विदेश

आज राज्यसभेत सादर होणार ‘तीन तलाक’ विधेयक

swarit

नवी दिल्ली | मोदी सरकारकडून बहुचर्चित ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत आज मांडण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जुजबी सुधारणांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजूरी दिली होती. आज या विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.‘तीन तलाक’ विधेयक सौम्य करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर होणार आहे.

तीन तलाक विरोधात महिला व तिचे कुटुंबच तक्रार करू शकतील, आरोपीला जामीन देण्याचा महादंडाधिकाऱ्यांना अधिकार सोपवण्यात आला आहे. तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे.

Related posts

#Coronavirus : संसदेत वित्त विधेयक मंजुरीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले

swarit

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk

काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदनाचे ट्विटर अकाऊंट डिलीट

News Desk