HW News Marathi
मुंबई

नारायण राणेंचे मंत्रिपद पुन्हा चर्चेत

मुंबई | ज्येष्ट नेते नारायण राणेंच्या नावाची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा राणे व त्यांचे सुपूत्र यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री उपस्थित असताना राणे यांना कोणते ना कोणते पद दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या काही दिवसांत मतदान होणार आहे. त्यामुळे राणे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा एक पर्याय आहे. तसेच राज्य मंत्री मंडळात त्यांना स्थान देण्यावर चर्चा झाल्याचे समजते. ही पदे कधी व केव्हा दिली जाणार आहे, हे मात्र भाजपने अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे राणे यांच्या पदाचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. असे असले तरी राणे यांच्या भेटीगाठीमुळे कॉँग्रेस व शिवेसनेच्या पोटात गोळा आला आहे.

कॉँग्रेसने नितेश राणे यांच्या भाजप अध्यक्ष भेटीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास आम्ही स्वाभिमान दाखवून सत्तेतून बाहेर पडू असा इशारा शिवसेनेने नेहमीप्रमाणे दिला आहे. एकूण राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे, हे मात्र निश्चित…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चौथा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

News Desk

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांनी रुळांवर उतरून केला प्रवास

News Desk

राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

News Desk
मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या टेंशनने ह्रदयविकारचा झटका

News Desk

मुंबई | महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला सुरू झाल्या आहेत. ऋतिक दिलीप घडशींने परीक्षा देण्याआधीच त्याचा ह्रद्यविकाराने त्याचा मृत्यू झाल. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी मानली जाते. विद्यार्थ्यांना कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवारकडून परीक्षेचे टेंशन दिले जाते.

प्रभावीदेवीच्या आदर्शनगर येथील ऋतिक दिलीप घडशी राहत होता. केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पेपर सोडविण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला सकाळी आईने उटवल्यानंतर ही न उटल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाले कुटुंबियांना कळाले.

हा दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता. ऋतिक मृत्यूनंतर दहावीच्या टेंशनने झाल्या सांगितले जात आहे. ऋतिक आई आणि दोन बहिणीसोबत राहत होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे प्रचंड टेंशनमुळे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे कळाले.

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! – आशिष शेलार

Aprna

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna