HW News Marathi
मुंबई

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

मुंबई | राज्यात आत्तापर्यंत कोरोनामूळे ४ जणांना मृत्यू झाला आहे. परंतु, तसे नसून कोरोनामूळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आलेल्या फिलिपिन्सच्या नागरिकाचा काल (२३ मार्च) मृत्यू झाला होता. मात्र, त्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ट्विटरवरुन ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, या फिलिपिन्सच्या नागरिकाने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवास केला होता आणि तिथल्या धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केले होते. त्यामुळे ज्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोनामूळे झाला होता तो त्यामूळे झालाच नव्हता आणि हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला त्यामुळे आता नागरिकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेला हा रुग्ण कोरोनातून बरा झाला होता. त्यांचा मृत्यू हा त्यांना असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झाला होता,असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच, कोरोनाबाधित उपचारानंतर बरे होतात आणि राज्यात अनेक कोरोनाबाधित बरे होऊन घरीही गेले आहेत. समाधानाची गोष्ट म्हणजे १०६ बाधितांपैकी १५ जण डिस्चार्ज घेऊन घरीही गेले आणि फक्त २ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

फिलिपिन्सच्या त्या नागरिकाचा प्रवास असा होता…

  • ३ मार्चला फिलिपिन्समधून १० जण मुंबईत आले होते. त्यांची राहण्याची सोय वाशीतील नूर मशिदीत केली होती.
  • ५ मार्चला हे १० जण वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गाने दिल्लीला गेले होते.
  • ६ मार्चला दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.
  • ७-९ मार्चच्या दरम्यान दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात या १० जणांनी सहभाग घेतला होता.
  • १० मार्चला रेल्वे मार्गाने हे १० जण दिल्लीहून मुंबईला परतले आणि पुन्हा वाशीतच मुक्कामाला गेले होते.
  • १० मार्चला त्यांच्यापैकी ६८ वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले.
  • १२ मार्चला तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
  • १३ मार्चला वाशी आणि दिल्लीतील या गटाने वास्तव्य केलेली मशिदी १४ दिवसांसाठी बंद करण्यात आली.
  • १४ मार्चला या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.
  • १७ मार्चला ६८ वर्षीय फिलिपिन्सच्या नागरिकाची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
  • अखेर २३ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

swarit

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

News Desk