HW News Marathi
मुंबई

Dahi Handi | ठाण्यात पहायला मिळणार प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार, 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस

ठाणे | श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रो-गोविंदा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मनसे १० थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस देणार आहे.

तर दुसरीकडे ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत. ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठान कडून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीला १० थरांसाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे.

ठाण्यातील हिरानंदानी मोडेज भागात पहिल्यांदाच स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बिग बॉसच्या पहिल्या सिझमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने ही दहीहंडी फोडली. यावेळी शर्मिष्ठा राऊत, माधव देवचाके, रिचा श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते. शेलार मामा दहीकला मंडळाच्या साथीने ४ थर रचून स्मिताने ही दहीहंडी फोडली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

News Desk

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

News Desk
क्राइम

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

News Desk

अहमदनगर | अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय ७०), रमेश भाऊसाहेब कातोरे (५१), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०), दगडू आनंदा भांगे (वय ५०) आणि हनुमान अंबादास दुसे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुक्यातील रहिवासी असून आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुला गेले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेने येत असताना अहमदनगर-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

Related posts

बलात्कार आरोपातून पतीची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या विवाहितेकडे वकिलाची सेक्सची मागणी

News Desk

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk