HW News Marathi
मुंबई

मी निर्दोष, राहुल गांधींचा न्यायालयात दावा

मुंबई | मी निर्दोष असल्याचा दावा, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधात केलेल्या ट्वीट प्रकरणी ट्वीट केल्याप्रकरणी सुनावणीसाठी राहुल गांधी आज (४ जुलै) दाखल झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर राहुल यांना जामीन मंजुर केला आहे. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले.

राहुल गांधी न्यायालयातून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला न्यायालयात हजर रहायचे होते. विचार धारेची लढाई आहे. मी शतकरी आणि गरीबांसोबत उभा राहणार आहे. मला जे सांगायचे ते मी राजीनाम्यातून सांगितले. आक्रमण होत आहे, मज्जा येत आहे. गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीने लढलो, त्यापेक्षा जास्ता दहापट ताखदीने लढणार असल्याचा इशारा राहुल गांधींनी भाजपला माध्यमांशी बोलताना दिला. “

संघाविरोधा माझी लढाई सुरुच राहणार असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल यांनी आज (४ जुलै) मुंबईत दाखल झाले आहेत. राहुल गांधी विमानतळावर दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कडव्या विरोधक होत्या. गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ‘भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या, संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो. अशा व्यक्तींवर हल्ले केले जातात, अशी ट्वीट राहुल गांधी यांनी केली होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत हाय अलर्ट जारी, ऐन सणा-सुदीच्या वेळी नवे संकट

News Desk

सरकारी योजना ,जनतेच्या योजना झाल्याविना यशस्वी होत नाहीत- मुख्यमंत्री

News Desk

डबलडेकर बस लवकरच होणार इतिहासजमा

Gauri Tilekar