HW News Marathi
मुंबई

खाजगी विद्यापीठातही मागासवर्गीय विद्यार्थ्याना फी प्रतिपूर्ती द्या

सत्ताधारी दहा आमदारांची सरकारकडे मागणी

मुंबई, राज्यात सुरू असलेल्या खाजगी, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठातही अनुसूचित जाती, जमाती आदी मागास प्रवर्गातील चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रवेशात आरक्षण देण्यात आले आहे, परंतु या विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्याना शुल्क प्रतिपूर्ती मिळत नसल्याने प्रवेशासाठी आरक्षण असले तरी त्याचा लाभ या विद्यार्थ्यांना घेता येत नाही, यामुळे या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्याना सरकारने शुल्क प्रतिपूर्ती द्यावी अशी मागणी सेना-भाजपाच्या दहा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या मागणीसाठी त्यांनी विद्यापीठांना देण्यात येणाऱ्या मंजुरीसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेतल्या जातात. सरकारच्या प्रचलित धोरणानुसार राज्यात पारंपरिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील नियमित अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तरच्या शिक्षणासाठी सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती ही सामाजिक न्याय विभागाकडून दिली जाते. यात खाजगी आणि स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठातून चालविण्यात येणारे अभ्यासक्रमही थोड्या फार फरकाने सारखेच आहेत.शिवाय पदवी आणि त्यांचे मूल्यही सारखे आहे. यामुळे सरकारने या खाजगी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती करावी, अशी मागणी आमदार डॉ. संतोष टारफे, आमदार पासकल, आमदार निर्मला गावित, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार अमित घोडा, आमदार डॉ. देवराव होळी आदी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई उपनगरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्सच्या संख्येत होणार वाढ

swarit

आरक्षणाचा विषय म्हणजे अशी आग, की त्यामुळे हात जळतील | रामदेव बाबा

News Desk

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट

News Desk

बारा तास वीज पुरवठा, शेतक-यांची पुन्हा चेष्ठा

News Desk

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna