HW News Marathi
मुंबई

आरपीआय नगराध्यक्षाने केली पोलीस कर्मचा-याला मारहाण

मुंबई एक दिवसीय गणपती विसर्जनाच्या दिवशी आरपीआयचे तालुका अध्यक्षाने पोलिस कर्मचा-याला मारहान केल्याची घटना समोर आली आहे. आरपीआय पक्षाचे वसई तालूका अध्यक्ष पोलिस कर्मचा-याला मारहान करतानाचा विडीओ क्लिप वायरल झालाय.

विरार पूर्व मनवेलपाडा तलावावर बंदोबस्तासाठी असलेल्या तुकाराम दराडे या पोलिस कर्मचा-याला मारहाण करण्यात आली आहे. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. मनवेल पाडा तलावावर गुरूवारी एकवीस दिवसाच्या दोन गणपतींचं विसर्जन होतं. एका गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संत नगर येथील दुसरा गणपती बारा वाजता तलावावर पोहचला होता. यावेळी वाद्य वाजविण्यास बंदी असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांनी वाद्य बंद करायला सांगितले होते. याच कारणावरुन गणेशभक्त आणि पोलिसांत धक्काबुक्की झाली होती. याच वादावादीतून मी आरपीआय वसई तालुका अध्यक्ष आहे. असे जोरजोराने ओरड़ून सांगत चक्क दराडे नावाच्या पोलिसांच्या कानशिलात लगावली. व्यंकटेश एस. रायल्ला असे मारहाण करणा-या व्यक्तीचे नाव आहे. तो आरपीआय गटाचा वसई तालुका अध्यक्ष आहे. विरारचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनाही आरेरावीची भाषा वापरत असताना मोबाइल क्लिपमध्ये दिसून येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk
देश / विदेश

राज्यसभेत उपसभापती पदासाठी मतदानाला सुरुवात

swarit

नवी दिल्ली | राज्यसभा उपसभापती पदासाठी गुरुवारी (आज) मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएचे खासदार हरिवंश आणि यूपीएचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात उपसभापती पदासाठी लढत होणार आहे. नक्की कोणत्या पक्षाचा उपसभापती होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे पी. जे. कुरियन १ जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त झाले होते. राज्यसभेचे सध्या २४५ खासदार आहेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी १२३ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ७३ खासदार असून काँग्रेसचे ५० खासदार आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आडिशोचे मुख्यमंत्री तथा बिजदचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Related posts

दहशतवादी हल्यात जखमी झालेल्या गर्भवती महिलेची यशस्वी प्रसुती

swarit

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला

News Desk

87 वर्षाचा पोस्टमन निघाला 1300 बालकांचा बाप

News Desk