HW News Marathi
मुंबई

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

मुंबई | मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत झालेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचता आले नाही. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेस वेळेवर न पोहोचता आले नाही. अशा विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुन्हा परीक्षा घेणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र 2 व 4 च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहचू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार आहे. तसेच एमए समाजशास्त्र सत्र 3ची आज दुपारी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे स्थानापन्न उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पावसामुळे मुंबईतील शाळा आणि महाविद्यायांना सुट्टी

मुंबईतील शाळा आणि महाविद्यायांनाही पावसाची स्थिती पाहता आज सुट्टी देण्यात आली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचे मंत्रिपद पुन्हा चर्चेत

News Desk

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

News Desk