HW News Marathi
मुंबई

सुशिक्षीत तरूणांना नोकऱ्यांऐवजी पकोडे तळण्याचा सल्ला देणे बेजबाबदारपणाचे लक्षण-सचिन अहिर

मुंबई भारताच्या पंतप्रधानपदासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने देशातल्या सुशिक्षीत तरूणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याऐवजी पकोडे तळण्याचासल्ला देणे, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असून बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईअध्यक्ष मा. सचिन अहिर यांनी केला आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या या बेजबाबदार सल्ल्याचा निषेध म्हणून मा. अहिर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीविद्यार्थी काँग्रेस वरळी तालुका अध्यक्ष अभिजित गजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी १०:३० वा. वरळी कोळीवाडा येथे ग्रैज्यूएटपकोडा स्टॉल लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाबाबत विचारले असता मा. अहिर म्हणाले की, या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या अपेक्षाअव्वाच्या सव्वा वाढवून ठेवल्या. देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ करून नवे रोजगार उपलब्ध करून देऊ, नवे उद्योग आणू, अशा एक ना अनेकघोषणा देत सरकारने सर्वसामान्यांची मते मिळवली. प्रत्यक्षात सरकार आल्यावर मात्र आपणच केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यात सरकारलासंपूर्णपणे अपयश आले. देशाचा विकास खुंटला, अर्थव्यवस्था मंदावली, दरडोई उत्पन्नात घट झाली, सकल राष्ट्रीय उत्पन्न घटले, उद्योगांनीकाढता पाय घेतला तसेच नवीन रोजगार निर्मितीही थंडावली. इतकेच नव्हे तर उपलब्ध असलेले रोजगारही नोटबंदी सारख्या निर्णयामुळेसर्वसामान्यांपासून हिरावले गेले. यावर उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान सुशिक्षित बेरोजगारांना जर पकोडे तळण्याचे सल्ले देत असतील तरहा सुशिक्षित बेरोजगारांचा अपमान आहे. पंतप्रधानांच्या या बेजबाबदार वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही मुंबईभरात आंदोलन करत असून भाजपचागरीबरथ ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पकोड्यांचे स्टॉल लावून सर्वसामान्यांना स्वस्त दरात पकोडेे उपलब्ध करूनदेतील, अशी माहिती मा. अहिर यांनी दिली. दरम्यान वरळी कोळीवाडा येथे आज झालेल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला सर्वसामान्यनागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अनिल परबांच्या अडचणीत वाढ होणार? ‘त्या’ चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा

News Desk

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

Aprna

आज मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk
राजकारण

खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो

News Desk

मुंबई | खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो असे वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. त्याच बरोबर हि निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आम्ही ती जिंकूच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

या संदर्भात सोमवारी विधानभवनात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुंडे म्हणाले, रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन असे काय झाले की त्यांनी माघार घेतली ? या प्रश्नाचे उत्तर फक्त तेच देऊ शकतील. सध्या आमच्या दृष्टीने निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. ती आम्ही जिंकूच परंतु या संदर्भात मी तुर्तास काही बोलणार नाही खरा धक्का निकालाच्या दिवशी लागेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related posts

पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी केलेल्या ‘रोड शो’चा अहवाल आयोगाने मागविला

News Desk

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

डॉ. आंबेडकरांचा पुतळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात उभारणार !

News Desk