HW News Marathi
मुंबई

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

मुंबई महापालिकेचा निर्णय

महापालिकेच्या निवडणूकीत मुंबईकरांना घरांवरील कर माफ करण्याचा आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पुर्ण होण्याची शक्यता आहे. 500 चौरस फुटावरी घरांना कर माफ तर 700 चौरस फुटावरील घरांच्या मालमतेवर करात सवलत मिळणार आहे. सभागृहाचे नेते य़श्वत जाधव यांनी कर माफ करण्याबाबत ठरावाची सुचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्राद्वारे दिली आहे. यावर पुढील महिण्यात महासभेत निर्णय घेण्याची शक्याता आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर शिवसेनेवर कडाडून टीका झाली होती. शिवाय भाजपासह विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. जकात कर बंद होण्याच्या मार्गावर असताना उत्पन्नाचा मोठा मार्ग असलेल्या मालमत्ता कर माफीने पालिका प्रशासन आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. मात्र आश्वासनपूर्तीसाठी सेनेला ही जोखीम उचलण्याची गरज आहे की नाही, यावर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात या आश्वासनाला गती मिळाल्याचे कळते.

तरी जीएसटी लागू होण्यापूर्वी या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. म्हणूनच मंगळवारी ५०० चौरस फुटांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याची ठरावाची सूचना सभागृहात आणावी, अशी मागणी जाधव यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. या महिन्यात पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून त्यास तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Adil

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna
मुंबई

नेवाळीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

News Desk

कल्याण – नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर पेरणी करण्यासाठी रोखण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप आलंय. कल्याण-नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सरकारनं बळजबरीनं संपादीत केली होती. त्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानं हिंसक स्वरूप धारण केलंय. मलंगगडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे आंदोलन सुरू कऱण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या काही गाड्या पेटवून दिल्याची माहिती समोर येतेय. तसंच काही पोलिसही यावेळी जखमी झाल्याची माहिती पुढं येतेय.

तत्कालीन इंग्रज सरकारनं मलंग रोडवरील नेवाळी येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यातील काही जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तर बहुतांश जागेवर अतिक्रमण झालंय. त्यामुळं या जागेवर संरक्षण विभागाचा की स्थानिक शेतकऱ्यांचा हक्का आहे, याविषयी संभ्रम कायम आहे. या जागेच्या मालकीबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

Related posts

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू

swarit

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

सुरक्षित ठिकाणी घर मिळण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांचे १३ दिवसांपासून आंदोलन सुरू

News Desk