HW News Marathi
मुंबई

सरकारने लोकशाहीचा खून केला | वळसे पाटील

मुंबई | विधानसभा अध्यक्षाविरोधात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर १४ दिवसांनंतर विधानसभा अध्यक्षांनी तो ठराव वाचून दाखवणे गरजेचे आहे. आम्ही पाच तारखेला या ठरावाची प्रत दिली. १९ तारखेला नोटीसीचा कालावधी संपला. २० तारखेला ही नोटीस सभागृहाला वाचून दाखवणे क्रमप्राप्त होते.

परंतु तसे घडले नाही. मुख्यमंत्र्यांनी अचानक अध्यक्षांच्या बाजुने विश्वास दर्शक ठराव मांडला व मंजूर करून घेतला. २००६ साली विलासराव देशमुख असताना असता ठराव आला होता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झालाच नसता. तरीही सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे गरज नव्हती. सरकारने एक चूक केल्यानंतर ती झाकण्यासाठी दुसरी चूक केली. या निमित्ताने सरकारने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk

माई आंबेडकर सभागृहाचे रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन

News Desk

राज्यातले सरकार नथुरामाच्या विचाराचे: सचिन सावंत

News Desk
देश / विदेश

हार्दिक पंड्यांचे आक्षेपार्ह ट्विटबाबत स्पष्टीकरण

News Desk

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज हार्दिक पंड्या यांच्या विरोधात जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती-जमाती कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कोणत्याही आक्षेपार्ह ट्विट केले नाही, असे स्पष्टीकरण हार्दिक पंड्या यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिले आहे.

जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती-जमाती कोर्टात गुरुवारी या याचिकेवर सुनावणी दरम्यान हार्दिक पंड्याविरोधात एफ. आय. आर. दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर हार्दिक पंड्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.

  • हार्दिक पंड्याचे स्पष्टीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटकरुन मी त्यांचा आपमान केल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडीयावर पसरल्या आहेत. पण, ‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट किंवा इतर कोणत्याही सोशल मीडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य मी केले नाही. हे ट्विट बनावट अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असे आक्षेपार्ह ट्विट केले आहे.’ मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो. देशातील सर्व जाती, जमाती आणि धर्माचा मी आदर करतो. लोकांच्या भावना दुखावल्या जाती असे आक्षेपार्ह ट्विट मी कधीच करणार नाही.

  • हार्दिक पंड्याचे ट्विट

हार्दिक पंड्या यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी पंड्याने ट्विटवरुन ‘कोण आंबेडकर?’ असे ट्विट पंड्याने त्यांच्या अकाऊंटवरुन केले होते. या ट्विटमुळे दलित समाजाच्या भावाना दुखवल्या’ असा आरोप डी. आर मेघवाल यांनी आरोप केला आहे. या ट्विट विरोधात डी. आर मेघवाल यांनी हार्दिक पंड्याविरोधात याचिका दाखल केली होती.

Related posts

निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

News Desk

मोदी सरकारविरोधात चार पक्षांचा अविश्वास प्रस्ताव

News Desk

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटला मायदेशी पाठवण्याची जोरदार मागणी

News Desk