HW News Marathi
मुंबई

पश्चिम बंगाल सरकारच्या हुकूमशाही विरोधात अभाविपचे भांडुप येथे आंदोलन

मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ममता बॅनर्जी सरकारच्या हुकूमशाही व मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या धोरणाविरोधात आज मुंबईत दादर आणि भांडुप येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथे पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांवर केलेल्या गोळीबारात २ विद्यार्थी मृत्यमुखी पडले. या अमानुष घटनेचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी परिषदेने मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी आंदोलन केले.

अभाविपचे स्पष्ट मत आहे की पश्चिम बंगाल सरकारचे हे अमानुष वर्तन अस्वीकारार्ह आहे. इस्लामपूर येथील घटनेत २ निर्दोष विद्यार्थ्यांचा मृत्यु ममता सरकारचा बंगाली अस्मितेवर हल्लाच आहे. मुंबई अभाविपने दादर येथे केलेल्या निदर्शनात कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढा सुरु ठेवणार असल्याचे, तसेच या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार असल्याचे यावेळी सांगितले.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथेही २५०० विद्यार्थी विद्यार्थिनींची भव्य रॅली काढून निषेध करण्यात आला. पश्चिम बंगालच्या हुकूमशाही सरकारने पोलिसांच्या मदतीने विद्यार्थी परिषदेचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनातील सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला, तसेच विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशीष चौहान व ६ इतर विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या सामान्य कार्यकर्त्यांना गुन्हेगराच्या कक्षेत ठेवण्यात आले. ममता सरकारच्या या हुकूमशाहीचा विद्यार्थी परिषद तीव्र शब्दात निषेध केला. या लोकशाही विरोधात चाललेल्या कारवायांचा विद्यार्थी परिषद तीव्र शब्दांत विरोध केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

swarit

गॅस कर्मचार्‍याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप

News Desk