HW News Marathi
मुंबई

…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा !

मुंबई | “माझा मुलगा बेपत्ता असल्याला आता तब्बल ३६ तास उलटले तरीही सापडलेला नाही. ही केवळ वरवरची शोधमोहीम राबविली जात आहे. या संपूर्ण परिस्थितीस महापालिकेसह पोलीस देखील जबाबदार आहेत. माझा मुलगा दिव्यांश जर सापडला नाही तर मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी दिव्यांश सिंह यांचे वडील सूरज सिंह यांनी केली आहे. सूरज सिंह हे पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत सूरज सिंह यांनी अनेक गोष्टी मांडल्या आहेत. गोरेगाव येथील आंबेडकरनगर परिसरात बुधवारी (१० जुलै) रात्री दिव्यांश सिंह नावाचा एक चिमुकला रस्त्यावरील उघड्या नाल्यात पडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. मात्र, ३६ तासांपासून सुरु असलेल्या या शोधमोहिमेला अद्याप यश आलेले नाही.

सूरज सिंह यांनी यावेळी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही प्रेमनगर येथील नाल्याजवळ शोधमोहीम सुरु असताना तेथे गेलो होतो. तिथून परत येत असताना माझ्यासोबत असलेला सामाजिक कार्यकर्ता श्रवण तिवारीला पोलिसांनी कॉलरला पकडून नेले. जे आम्हाला मदत करत आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा गंभीर आरोप सूरज सिंह यांनी केला आहे. “माझा मुलगा जर सापडला नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा”, अशी संतप्त मागणी देखील सूरज सिंह यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

News Desk

अबब ! अर्शद वारसीच्या वीज बिलाची इतकी किंमत?

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत

swarit