HW News Marathi
मुंबई

भाजपच्या ३ प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास बंदी

मुंबई | आपल्याच पक्षातील नेत्यांच्या अत्यंत बेताल आणि वादग्रस्त अशा व्यक्तव्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच सावध होत भाजपने राज्यातील आपल्या तीन प्रमुख प्रवक्त्यांवर बोलण्याचीच बंदी घातली आहे. दहीहंडी उत्सवात स्त्रियांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार राम कदम, बलात्काराचा आरोप असलेले मधू चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार म्हणणारे अवघूत वाघ यांच्यावर माध्यमांसमोर येऊन बोलण्यास भाजपकडून बंदी घालण्यात आली आहे.

“तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल पण तिने नकार दिला तर तुमच्या आई-वडिलांना माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला ती मुलगी पळवून देण्यास मदत करेन”, असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात केले होते. कोणत्याही व्यक्तीने विशेषतः एखाद्या लोकप्रतिनिधीने हे असे विधान करणे ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सर्वत्र उमटली होती. त्यामुळे भाजपकडून राम कदम यांना माध्यमांसमोर बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

भाजपचे नेते मधू चव्हाण यांच्यावर एका महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनाही प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका न मांडण्याची सूचना देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी याना भगवान विष्णूचा ११ वा अवतार म्हणणारे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावरही प्रसारसमाध्यमांसमोर बोलण्याची मनाई करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपला सध्या अनेक कारणांमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याच नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवित आहेत. म्हणूनच भाजपकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

मुंबईतील आव्हानांना सामोरे जाताना समतोल भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी संपदा मेहता

News Desk

लोकल घसरली; ३ जखमी

News Desk
देश / विदेश

अमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात

News Desk

अमृतसर | पंजाबमधील अमृतसरमध्ये रावण दहनादरम्यान मोठा अपघात घडला आहे. अमृतसर येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. त्यांना रुळावरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.

Related posts

…त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही” मोदींचा टुलकिट खुलाशावर हल्लाबोल

News Desk

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

News Desk

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूने रचला इतिहास….!

News Desk