HW News Marathi
मुंबई

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा, भिंत पडल्याने कुर्ल्यात तीन जण जखमी

मुंबई | कुर्लामध्ये रेल्वेच्या हद्दीतली एक भिंत कोसळल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. या दुर्घटनेत ३ स्थानिक जखमी झाले आहेत. जखमीवर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमीर शैख असे एका जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

कुर्ला पश्चिमेच्या हरियाणावाला लेनवर ही भिंत कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तब्बल २० फुटांहून अधिक उंचीची ही भिंत सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही महिन्यापासून ही भिंत कमकुवत झाल्याने एका बाजूला कलली होती. त्यमुळे या परिसरात राहणारे रहिवाश्यांनी या संरक्षक भिंतीबाबत तक्रार दाखल केली होती. याशिवाय स्थानिक आमदारांनी देखील तक्रार केली होती परंतु तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या भिंतीच्या बाजुलाच जखमी झालेल्या ३ स्थानिक रहिवाश्यांची चाळ असून यामुळे स्थानिक राहिवशांचा चाळीत येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या भिंतीच्या बाजूलाच अमिर शैख या पानवाल्याचा ठेला असून सकाळची वेळ असल्यामुळे पानवाल्याच्या ठेल्यावर गर्दी होती. मात्र, अचानकच ही भिंत कोसळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या दुर्घटनेमध्ये पानवाल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ठेल्यावरच्याच आणखी एका व्यक्तीला पायाला जबर दुखापत झाली आहे. त्याशिवाय आणखीही एक व्यक्ती जखमी झाली असून त्या व्यक्ती संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता ‘पोलीस काकां’वर

News Desk