HW News Marathi
मुंबई

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा, भिंत पडल्याने कुर्ल्यात तीन जण जखमी

मुंबई | कुर्लामध्ये रेल्वेच्या हद्दीतली एक भिंत कोसळल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. या दुर्घटनेत ३ स्थानिक जखमी झाले आहेत. जखमीवर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमीर शैख असे एका जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

कुर्ला पश्चिमेच्या हरियाणावाला लेनवर ही भिंत कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तब्बल २० फुटांहून अधिक उंचीची ही भिंत सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही महिन्यापासून ही भिंत कमकुवत झाल्याने एका बाजूला कलली होती. त्यमुळे या परिसरात राहणारे रहिवाश्यांनी या संरक्षक भिंतीबाबत तक्रार दाखल केली होती. याशिवाय स्थानिक आमदारांनी देखील तक्रार केली होती परंतु तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या भिंतीच्या बाजुलाच जखमी झालेल्या ३ स्थानिक रहिवाश्यांची चाळ असून यामुळे स्थानिक राहिवशांचा चाळीत येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या भिंतीच्या बाजूलाच अमिर शैख या पानवाल्याचा ठेला असून सकाळची वेळ असल्यामुळे पानवाल्याच्या ठेल्यावर गर्दी होती. मात्र, अचानकच ही भिंत कोसळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या दुर्घटनेमध्ये पानवाल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ठेल्यावरच्याच आणखी एका व्यक्तीला पायाला जबर दुखापत झाली आहे. त्याशिवाय आणखीही एक व्यक्ती जखमी झाली असून त्या व्यक्ती संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकलमधील टोळक्याची जेष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

News Desk

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू

News Desk

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

News Desk
देश / विदेश

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk

लखनौ । एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झालेल्याची धक्कादायक घटना अलाहाबादमध्ये घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना सोरांव परिसरातील असून प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, सात वर्षांचा मुलगा विराट आणि पत्नी किरण यांची आई कमलेश देवी या चारही जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मात्र या चौघांच्या हत्येचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

परंतु मारेक-यांनी सिंह यांचा एक वर्षाच्या मुलीला जिवंत सोडले. या मुलीचा जन्म महिन्याभरापुर्वीच झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सिंह यांच्या शेजा-यांना या चिमुकलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ही मुलगी का रडते आहे, हे विचारण्यासाठी शेजा-यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांना काही उत्तर मिळाले नाही. शेवटी शेजा-यांनी घरी जावून पाहिले तेव्हा धक्काच बसला. लहान मुलीव्यतिरीक्त सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजारच्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यामागचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Related posts

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन

News Desk

पोक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या दोषींनी दयेचा अर्ज करता येऊ नये !

News Desk

मजुरांच्या प्रश्नांबाबत केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk