HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

मुंबई | मुंबईची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना थायलँड वारी घडवून आणण्याचे कौतुकास्पद पाऊल पश्चिम रेल्वेने उचले आहे. रेल्वेच्या ५२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थायलँडमध्ये पर्यटनासाठी पाठवले आहे. यामध्ये गँगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक शनिवारी रवाना झाले असून पाच दिवसांनंतर ते मायदेशात परतणार आहेत. या सहलीसाठी त्यांनी थॉमस अँण्ड कूक या ट्रॅव्हल कंपनीसोबत करार केला आहे.

या ट्रीपच्या एकूण खर्चापैकी फक्त ३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. उर्वरित सर्व रक्कम कर्मचारी कल्याण निधीतून खर्च करण्यात येणार आहे. रेल्वेने टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग देऊन या कर्मचाऱ्यांना रवाना केले. पश्चिम रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सहल आखण्यात आली, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. ५२ जणांच्या या पथकात २० महिला, २८ पुरुष आणि ४ टूर कॉर्डिनेटर सहभागी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालयात नेमके काय घडले ? वाचा सविस्तर संभाषण

News Desk

गोवर संसर्ग : मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Aprna

वांद्रेमधील गरीब नगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग

News Desk
राजकारण

धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच !

News Desk

मुंबई | ‘मु्स्लिम समाजातील मागास जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला असून केवळ धर्माच्या आधारे त्यांना आरक्षण देणे असंविधानिक आहे. आंध्र प्रदेश सरकारने आणि केरळ सरकारने याआधी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, तो टिकला नाही. मुस्लीम समाजातील अन्य कोणत्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असल्यास त्याबाबत मागासवर्ग आयोगाकडे निवेदन देण्यात येईल’ असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासह मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. विधानसभेत आज आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना आमदार शेख रशिद यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण देता येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण, अद्याप मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. याबाबत सरकार काहीच का बोलत नाही, असा प्रश्न आमदार शेख रशिद यांनी विधानसभेत विचारला होता. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

तसेच मराठा आरक्षणावर बोलताना ते असे म्हणाले की, उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर निर्णय झालाच नाही. तसेच, याला आम्ही स्थगिती देत नाही, याचा अर्थ खटला संपला नसून तो खटला अजून चालायची आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात एकूण ५२ टक्के आरक्षणाला आणि ओबीसींच्या प्रवर्गाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

Related posts

…त्या दिवशी पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल !

Gauri Tilekar

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

News Desk

RamMandir : अशी आहे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था

News Desk